सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारला वाढताहेत कोरोनाचे मृत्यू; शनिवार,रविवार जनता कर्फ्यू लागू

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्या बरोबरच कोरोना रुग्णांचेही पाठोपाठ मृत्यू होताहेत

Nandurbar. MH
  • Mar 23 2021 3:57PM
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्या बरोबरच कोरोना रुग्णांचेही पाठोपाठ मृत्यू होताहेत. म्हणून नगर पालिका क्षेत्र, नगर पंचायत व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येक शनिवारी व रविवारी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांनी स्वतःच सर्व नियम पाळून दक्षता वाढवणे नितांत गरजेचे बनले आहे.
 
जिल्ह्यात 21मार्च 2021 रात्री 8 पर्यंत एकूण 329 पैकी 153 व्यक्तिंचे कोरोना पॉझिटीव्ह आढळले. 22 मार्च रोजी 1881 चाचण्या झाल्या. त्यातून 504 पॉझिटिव्ह आढळले. संख्या चिंताजनक रित्या वाढत असतानाच मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. सहा दिवसांपूर्वी एकाच दिवसात 5 मृत्यू झाले. 21 मार्च रोजी एकाच दिवशी 4 मृत्यू झाले. तर 22 मार्च रोजी एकाच दिवशी 6 मृत्यू झाल्याची शासकीय माहिती आहे. जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याचे हे निदर्शक मानले जाते. परिणामी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगर पालिका क्षेत्र तसेच अक्राणी नगर पंचायत व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात येत्या 15 एप्रिलपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले असून जनता कर्फ्युला स्वत:हून प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
     आदेशात म्हटले आहे की, या क्षेत्रात आठवड्याच्या शनिवारी व रविवारी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना,गॅस वितरण सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. वरील ठिकाणातील अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या वाहनासाठी पेट्रोलपंप सुरू राहतील, अन्य वापरासाठी प्रतिबंध असेल. सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना व शासकीय कार्यालये या दिवशी बंद असल्याने शनिवार व रविवारी कोणीही बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडताना रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे. आठवड्यातील इतर दिवशी सर्व आस्थापना, दुकाने सकाळी 6 ते सायं. 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल.
कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार