सुदर्शन न्यूज केतन रघुवंशी नंदुरबार
नंदुरबार : उत्तर महाराष्ट्रतातील तीन महिला खासदारांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैटकीत पक्ष संघटन वाढविणे, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला.
राज्य सरकारचे विविध आघाडींवरील अपयश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनमानसात पोहचावे असेही आवाहन खासदारांनी केले.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा खासदार डॅा. भारती पवार, पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता खासदार डॅा.हिना गावीत,
खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तिन्ही खासदारांनी पक्ष वाढीसाठी व संघटनासाठी लिल्हयात सुरू असलेल्या कामाबाबत समधान व्यक्त केले.
राज्य सरकार एक वर्षात विविध आघाडींवर सपशेल अपयशी ठरले आहे. जनमानसात नाराजीची भावना आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी सामान्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रन्श् ऐकुन घेत सोडवावे असे आवाहन त्यांनी केले.
महिला सक्षतीकरणावर खासदार डॉ. भारती पवार, डॉ. भारती पवार, डॉ.हिना गावीत, रक्षा खडसे यांनी भर दिला.
महिला अत्याचाराच्या घटना राज्यात गेल्या वर्षभरात वाढल्या आहेत.