कोरोना च्या पार्श्वभूमीवर सगळीकडे खर्च कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता सामान्य जनतेकडे बिल भरायला देखील पैसे राहणार नाही. ही गोष्ट हेरून भाजपाचे पूर्व ऊर्जामंत्री यांनी चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल अशा कुटुंबांचे विजेचे बिल माफ करावे अशी विनंती तीन महिन्यांपासून ते करीत आहेत.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे त्रिकूट सरकार आहे.. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेश सरकारला विजेचे बिल माफ करावे अशी सूचना दिली त्याच धर्तीवर पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या नेत्यांचे म्हणणे ऐकावे आणि महाराष्ट्रात सुद्धा विजेचे बिल 300 युनिट पर्यंत माफ करावं अशी सूचना उद्धव सरकारला दिली आहे..