२९ ऑगष्ट रोजी महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना खुली करण्यासाठी राज्यसरकार विरोधात होणार घंटानांद आंदोलन.. .
बुलढाणा : कोरोना महामारीच्या काळात मठ - मंदिराचे बंद करण्यात आलेले दरवाजे
(योगेश शर्मा)
बुलढाणा : कोरोना महामारीच्या काळात मठ - मंदिराचे बंद करण्यात आलेले दरवाजे उघडण्यात यावे यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
कोरोणाच्या काळात जीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील मांस, मदिरा ( दारू ) सर्व काही खुले केले आहे . मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना अजून बंदच ठेवलेले आहे. महाराष्ट्रातील देवस्थाने धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे . केंद्र सरकारने ही 4 जून 2020 रोजी परिपत्रक जारी केले होते त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू केले आहेत
राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम व अटीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन-किर्तन व पूजन करण्याची मागणी सर्व भाविक भक्तांची होत आहे तरी याकडे निद्रस्त ठाकरे सरकार लक्ष देत नाही . यासाठी भाद्रपद शु . 11 शके 1942 शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता घंटानाद आंदोलन विश्व हिंदू परिषदच्या वतीने महाराष्ट्रात करण्यात येणार असून सर्व मंदिर प्रमुख, विश्वस्त, भाविक भक्त, व्यावसायिक तसेच वाहतूक संघटनांनी व जिल्ह्यामधील विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकत्यांनी जिल्हा व तालूका स्तरावर एकत्रित येऊन प्रत्येकाने तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून सोशल डिस्टंसिंगच्या नियम व अटींचे पालन करत या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा संयोजक प्रवीण अंभोरे यांनी केले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प