उद्योगांचे विकेंद्रीकरण आर्थिक-सामाजिक मागास लहान शहरात होण्याची गरज.- गडकरी*
उच्च तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आपल्या देशात उपलब्ध असताना या क्षेत्राची आयात कमी होऊन निर्यात वाढली पाहिजे. परकीय गुंतवणूक आल्याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही. उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले तर रोजगार निर्मिती होईल व आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या भागांचा विकास होईल.
नवे उद्योग सुरू करण्यासाठी देशातील मोठ्या महानगरांचीच निवड केली जात असते. त्यामुळे मोठ्या महानगरांमध्ये आता खूप गर्दी झाली आहे. नवीन उद्योग आता आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लहान शहरांमध्ये सुरू करून उद्योगांचे विकेेंद्रीकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहूतक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
व्हिडिओ कॉन्फरहन्सच्या माध्यमातून गडकरी यांनी व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीच्या न्यू ग्लोबर इनोव्हेशन पार्कचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरचजी देशातमेोठ्या प्रमाणात आयात केली जाते. उच्च तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आपल्या देशात उपलब्ध असताना या क्षेत्राची आयात कमी होऊन निर्यात वाढली पाहिजे. परकीय गुंतवणूक आल्याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही. उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले तर रोजगार निर्मिती होईल व आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या भागांचा विकास होईल. हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग आहे, असेही गडकरी यांनी म्हटले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प