उद्योगांचे विकेंद्रीकरण आर्थिक-सामाजिक मागास लहान शहरात होण्याची गरज.- गडकरी*
उच्च तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आपल्या देशात उपलब्ध असताना या क्षेत्राची आयात कमी होऊन निर्यात वाढली पाहिजे. परकीय गुंतवणूक आल्याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही. उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले तर रोजगार निर्मिती होईल व आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या भागांचा विकास होईल.