तळोदा ते वाकाचार चौफुली ( अंतुर्ली ) पर्यंतचा रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली
पर्यंतचा रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली
तळोदा ते वाकाचार चौफुली ( अंतुर्ली ) पर्यंतचा रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून येथील खड्डेमय रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे यामुळे कायमस्वरूपाचीच उपाययोजना होणे गरजेचे झाले आहे.
बऱ्याचदा गरोदर माता व वृद्धांसाठी हे रस्ते पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतोय. विशेष म्हणजे रूग्णाला उपचारासाठी नंदुरबार येथे हलवतांना रूग्णाचा नातेवाईकांना चार वेळा विचार करावा लागत असतो त्यातच वाळू वाहतूक करणार्या अवजड वाहनामुळे कधी कोणाचा अपघात होईल हे सांगता येत नाहीये
खरे तर हातोडा पूल बनल्यामुळे जनतेला नंदुरबार जाण्याची योग्य सोय झाली असतांना या बिकट रस्त्यांमुळे नंदुरबार पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकी वारंवार पंक्चर होते, छोटे मोठे अपघात तर रोजच घडतात या रस्त्याची तातडीने कायमस्वरूपाचीच दुरुस्ती होणे गरजेचे आहे अशी मागणी वाहनचालक सातत्याने करताना दिसून येतात
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प