सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुढील 30 दिवस भारतासाठी धोक्याचे, कोरोनाबाधितांची संख्या 5.5 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

सिंगापूरच्या ड्यूक एनयूएस मेडिकल स्कूलच्या सहकार्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं (IIT) गुवाहाटी यांनी विविध राज्यांमध्ये येत्या 30 दिवसांत कोरोना संसर्गाच्या घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक नवीन मॉडेल विकसित केले आहे

Aishwarya Dubey
  • May 11 2020 10:39AM

नवी दिल्ली, 11 मे : जगभरात थैमान घालत असलेला कोरोना सध्या, भारतातही चिंता वाढवत आहे. भारतात कोरोनाबाधितांच्या संख्या 62 हजार 939वर पोहचली आहे. तर 2 हजार 109 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसविरुद्धच्या लढाईत देशाला जिंकवण्यासाठी सर्व संस्था एकवटवल्या आहेत. यातच सिंगापूरच्या ड्यूक एनयूएस मेडिकल स्कूलच्या सहकार्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं (IIT) गुवाहाटी यांनी विविध राज्यांमध्ये येत्या 30 दिवसांत कोरोना संसर्गाच्या घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. यानुसार भारतात येत्या 30 दिवसांत 5.5 लाख प्रकरणे समोर येतील.

हे नवीन मॉडेल नुकतेच देशात संक्रमणाचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तीनही मॉडेल्सच्या मदतीने तयार केले गेले आहे. या मॉडेल अंतर्गत राज्ये तीन विभागांमध्ये विभागली गेली आहेत. हे वर्गीकरण विद्यमान रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनपेक्षा वेगळे आहे. संशोधकांच्या पथकाने सांगितले की सध्या लॉजिस्टिक पद्धतीने 30 दिवसांत 1.5 लाख आणि घातांकीय (एक्सपोनेंशिअल) पद्धतीने 5.5 लाख प्रकरणे आढळतील अशी शक्यता वर्तवली आहे. IIT गुवाहाटीचे सहाय्यक प्राध्यापक पलाश घोष म्हणाले की, कोणत्याही एका मॉडेलने केलेला अंदाज योग्य होणार नाही. हे लक्षात घेऊन आम्ही तिन्ही मॉडेल्स एकाच वेळी वापरली आहेत. यासह, मॉडेल विनामूल्य दररोज संसर्ग दर देखील वापरला गेला आहे.

देशात कोरोनामुळं रविवारी 2 हजार 109 लोकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 128 लोकांचा मृत्यू झाला तर 3 हजार 277 नवीन प्रकरणं समोर आली. देशातील 41 हजार 472 लोकांची प्रकृती गंभीर आहे. देशात सर्वात जास्त मृतांची नोंद महाराष्ट्र राज्यांत आहे. महाराष्ट्रात 779, गुजरात 472, मध्य प्रदेश 215, पश्चिम बंगाल 171, राजस्थान 106, उत्तर प्रदेश 74, दिल्ली 73 आणि आंध्र प्रदेश-तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 44-44 लोकांना मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 19 हजार 357 लोकं निरोगी झाले आहेत.

भारतात 17 मेपर्यंत लॉकडाऊन

दरम्यान भारतात 3 मेपर्यंत पुन्हा 2 आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळं 17 मेपर्यंत सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे. या काळात देशातील जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करून त्याप्रमाणे नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र भारतात कोरोनाची 62 हजार 939 प्रकरणे असल्यामुळं लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला जाऊ शकतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार