*तर शाळा बंद ठेवा, शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सूचना*
नंदुरबार - पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागल्याने अनेक ठिकाणी शाळांना पुन्हा एकदा कुलूप लावले गेले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकता वाटल्यास शाळा बंद ठेवाव्यात, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
वर्षा गायकवाड म्हणाल्या अनेक ठिकाणी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत.
ज्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला तिथे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करावी.
त्याच बरोबर सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून याबाबत आढावा घेण्यात येत आहे.