सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नंदुरबार दि.7: हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असून दुपारी 4 वाजता हतनूर धरणातुन तापी नदीपात्रात 54 हजार 421 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Nandurbar MH
  • Sep 8 2021 12:11PM
 
नंदुरबार दि.7: हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असून  दुपारी 4 वाजता  हतनूर धरणातुन तापी नदीपात्रात 54 हजार 421 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने  नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
 पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे 2 दरवाजे पूर्णपणे उघडून 45 हजार 423 क्युसेक्स  व  प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे पूर्णपणे उघडून 46 हजार 761 क्युसेक्स  इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. 

 तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार