अनलॉक ४ जाहीर करताना केंद्रानं सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील सार्वजनिक कार्यक्रमांना २१ सप्टेंबरपासून मुभा दिली होती. त्यामुळे आजपासून नियमावलीचं पालन करून हे समारंभ आयोजित करता येणार आहेत.या समारंभांना फक्त १०० व्यक्तीच उपस्थित राहु शकणार आहे. तसं केंद्रानं स्पष्टपणे नियमावलीत म्हटलं आहे..