दोंडाईचा पोलीस ठाण्यात नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक डॉ. डी जी शेखर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठकी संपन्न झाली.
शासन कोणत्याही पक्षाचे असो सर्वप्रथम नागरिकांनचा विचार करते. कोरोनात कुटुंबीयांतील सदस्य मित्र यांना गमावलं आहे. कोरोनाचा हल्ला भयंकर आहे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार कोरोनाचा फैलाव न करता सण साजरा करावा. कायदा सुव्यवस्था राखत समजदारीने गणेशोत्सव साजरा करा.
नाशिक विभागीय पोलिस उप महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर, जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव,पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, पराग बेडसे व्यासपीठावर होते. नाशिक येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश जाधव रामभाऊ माणिक, शैलेश सोनार, बळीराम पाटील, अहमद शेख, आकाश कोळी, राकेश अग्रवाल, बिलाल बागवान, रईस बागवान, दादा बाबा आणि वीर भगतसिंग गणेश मित्रमंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाजंत्री वाजण्याची मूबा द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. मात्र पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सण उत्सव साजरा करता आले नाही माणसा माणसात अंतर वाढत जात आहे.परंतू कोरोनाची तिसरी लाट भीषण असल्याने संयम शिस्त राखत विसर्जन मिरवणुकीत पन्नास पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले.
बैठकीसाठी सहायक पोलिस निरीक्षक डॉ संतोष लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील, दिनेश मोरे, सचिन गायकवाड, राकेश खांडेकर आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सदाशिव भलकार यांनी केले. तर आभार डॉ.संतोष लोले यांनी व्यक्त केले ..
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333