मुंबई : आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत असुन परंपरेनुसार नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन कोरोनामुळं दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच हिवाळी अधिवेशन मुंबई मध्ये होणार असुन या दोन दिवसात विरोधी पक्षाला कोरोना, मराठा, आरक्षण, शेतकरी मदतीवरुन सरकारला घेरण्याची शक्यता आहे, तर सरकार दुसरीकडे दोन महत्वाची विधेयक विधिमंडळात मंजूर करुन घेण्याचा तयारीत आहे. यात प्रामुख्याने महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक शक्ती कायद्यासंदर्भातील विधेयकाचा देखील समावेश आहे. यावेळी विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांऐवजी दोन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. तसेच कालच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार घातला होता.