मोदी सरकार कल्पनेची परिपक्वता आत्मनिर्भर भारत
कोरोनाशी चार हात करताना गोरगरिबांचे कल्याण आणि आत्मनिर्भय भारता साठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची पहिलाच वर्षी प्रभावी कामगिरी समोर दिसून आली आहे.
नागपूर -- कोरोनाशी चार हात करताना गोरगरिबांचे कल्याण आणि आत्मनिर्भय भारता साठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची पहिलाच वर्षी प्रभावी कामगिरी समोर दिसून आली आहे.
मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने अनेक मोठे निर्णय घेऊन अत्यंत प्रभावीपणे पहिले वर्षाची कारकीर्द पूर्ण केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनाची
अंमलबजावणी करत. देशातील अनेक वर्षांच्या विवादीत समस्या सोडवणारे ऐतिहासिक निर्णय देखील याच वर्षी वैशिष्ट्यपूर्ण रित्या घेण्यात आले. असे माजी अर्थमंत्री. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रपरिषदेत नमूद केले.
मोदी सरकारचा एक वर्षाच्या कारकीर्दीची माहिती देण्यासाठी भाजपने झूम ॲप व आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताने करोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी उपाय योजना केल्या आहे.
काही देशांमधील जी कोरोना बाधितयांची संख्या होती. त्या 14 देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. एक सारखी लोकसंख्या असूनही 1 जून ला या 14 देशातील एकत्रित लोकसंख्येपैकी कोविड चा संसर्ग झाल्याची संख्या भारतात 22.5 पट अधिक आहे. या 14 देशांमध्ये कोविड मुळे झालेल्या मृत्यूची संख्या भारतातील मृत्यु संख्येच्या तुलनेत 55.2 पट इतकी आहे. योग्य वेळी घेतलेल्या देशव्यापी लॉक डाऊनच्या निर्णयामुळे कोरोना चा मुकाबला करण्यासाठी झटपट वैद्यकीय सुविधा निर्माण केली. देशात एकही PPE किट तयार होत नव्हती. मात्र आज ती मोठ्या प्रमाणात मेक इन इंडिया च्या माध्यमातून तयार होत आहे.
देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून, देश आत्मनिर्भर करण्यासाठी 20लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्याचा कायदा देखील सुधारणे सह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा ही जाहीर करण्यात आले आहे. शेतकरी लघु उद्योजक, पाथारीवाले, छोटे व्यवसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतिमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल अशी खात्री माजी अर्थमंत्री आ. मुनगंटीवार यांनी दिली.
झूम ॲप वरून झालेल्या या पत्रपरिषदेत प्रास्ताविक विश्वास पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन आमदार गिरीश व्यास यांनी केले. पत्रपरिषदेला खासदार अशोक नेते, पक्ष प्रवक्ते केशव उपाध्ये, संजय फांजे, चंदन गोस्वामी उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प