सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ज्ञानेश्वर-तुकाराम पालखी महामार्गांच्या सुशोभिकरणासाठी सूचना पाठवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या महान विभूतींच्या नावाने महाराष्ट्रात निर्माणाधीन असलेल्या दोन पालखी महामार्गांचा सर्वंकष विकास आणि सुशोभिकरण यासाठी सूचना पाठविण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

Snehal Joshi .
  • Jan 16 2021 10:04PM
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या महान विभूतींच्या नावाने महाराष्ट्रात निर्माणाधीन असलेल्या दोन पालखी महामार्गांचा सर्वंकष विकास आणि सुशोभिकरण यासाठी सूचना पाठविण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
या दोन महामार्गांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता त्यांचे सुशोभिकरण करण्याचा आमचा मानस आहे. या कामी लोकसहभाग अपेक्षित असून सर्व स्तरातील सुजाण नागरिक, लोकप्रतिनिधी, वारकरी यांच्यामार्फत येणार्‍या सूचनांच्या आधारे या कामात योग्य बाबींचा समावेश केला जाणार आहे, असेही ना. गडकरी यांनी म्हटले आहे.
“वारी” हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठोबाच्या चरणी सेवा अर्पण करणार्‍या समस्त वारकर्‍यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दोन्ही पालखी मार्गांना महामार्गाचा दर्जा दिला असल्याचेही ना. गडकरी यांनी  स्पष्ट केले आहे. या महामार्गांसाठीच्या सूचना नागरिकांनी ‘www.palkhimarg.com’ या संकेतस्थळावर नोंदवाव्यात तज्ञांच्या समितीमार्फत सूचनांची छाननी होऊन त्यातील चांगल्या, उल्लेखनीय सूचना नोंदविलेल्या व्यक्तींचा योग्य गौरव केला जाईल, असेच त्यांची नावे संकेतस्थळावर प्रकाशित केली जातील, असेही सांगण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग
पुण्यातील हडपसरपासून मोहोळपर्यंत संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग विकसित केला जात असून सुमारे 234 किमी लांबीचा हा प्रकल्प आाहे. या प्रकल्पाअंतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असून वारकर्‍यांच्या सोयीसाठी दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत. हा महामार्ग सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटन, नातेपुते, माळसिरस, वाखरी, पंढरपूर याा गावांच्या हद्दीतून जातो. सुरक्षिततेसाठी काही गावांना बाह्यवळण रस्ते प्रस्तावित केले आहेत. त्यासाठी अंदाज 3 हजार 966 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भूसंपादनासह एकूण अंदाजे 7 हजार 265 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही ना. गडकरी यांनी म्हटले आहे.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग
पुणे जिल्ह्यातील पाटसपासून तोंडले-बोंडलेपर्यंत संत तुकाराम महाराज महामार्ग विकसित केला जात असून 136 किमीच्या या प्रकल्पातही रस्त्याचे चौपदरीकरण व दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत.हा मार्ग बारामती, निमगाव, केतकी, इंदापूर, अकलूज वाखरी याा गावांमधून जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गावांना वळण रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या महामार्गासाठी अंदाज बांधकाम खर्च एकूण 11 हजार 680 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पूर्वापार चालत आलेली पालखी व वारी परंपरा यापुढील काळात अधिक सुकर व सोयीची होण्यासाठी या महामार्गांची मोठी मदत होईल, असा मला विश्वास वाटतो, असेही ना. गडकरी यांनी म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार