सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

यंदा दहावी आणि बारावीचा निकाल लागणार या तारखांना

दरवर्षी मे महिन्याच्या आसपास लागणारा दहावी आणि बारावीचा निकाल यावर्षी राज्यभर असलेल्या करोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे पुढे गेला आहे.

Snehal Joshi
  • Jun 7 2020 10:22AM
दरवर्षी मे महिन्याच्या आसपास लागणारा दहावी आणि बारावीचा निकाल यावर्षी राज्यभर असलेल्या करोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉक  डाऊन मुळे पुढे गेला आहे. राज्य सरकारने लोक डाऊन मध्ये शीतलता दिल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेण्यात येऊन दहावीच्या 40 ते 45 टक्के तर बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण  झाल्या आहे. म्हणून यंदाचा दहावीचा निकाल  20 ते 30 जुलै पर्यंत बारावीचा निकाल 6 ते 15 जुलै दरम्यान  लागणार असे जाहीर करण्यात आला आहे.

 दहावीच्या परीक्षेच्या अंतिम पेपर च्या कालावधीत राज्यात लॉक  डाऊन जाहीर करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला. मात्र राज्यातील लॉक डाऊन  वाढविण्यात आल्याने दहावी भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक शास्त्र पेपर 2 म्हणजेच भूगोल या विषयाचे गुण  विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रूपांतर परीक्षा रद्द करण्यात आलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर विषयाचे गुण किती आहेत. त्या  गुणांची सरासरी लक्षात घेऊन भूगोलाच्या पेपर ला गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रके वर इतर कोणताही शेरा नसेल. असेही मंडळाकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे. 15 जून पासून शाळा सुरू करता येतील का....  या प्रतिबंधित क्षेत्र  वगळून अन्य ठिकाणी विशेष करून ग्रामीण भागातील शाळा मोकळ्या मैदानात दोन, तीन सत्रात भरवणे शक्य आहे. यावर राज्यत  आज बैठक आयोजित करण्यात आली होती. शाळा कधीपासून सुरू होतील हे  सोमवारी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. 

  लॉक डाउन शिथील झाल्यानंतर 14 मे पासून उत्तर पत्रिका तपासणीला वेग आला असून, आतापर्यंत बारावीच्या एकूण उत्तरपत्रिकेत पैकी सुमारे 60 टक्के तर दहावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची पैकी 40 टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई पुणे सोलापूर सह अन्य भागांमध्ये संसर्ग वाढत असल्याने त्या ठिकाणी उत्तरपत्रिका तपासण्याचे  काम  टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे. त्यामुळे बारावीचा निकाल सर्वप्रथम 14 जुलैपर्यंत. तर दहावीचा निकाल 30 जुलैपर्यंत जाहीर होईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. काही फेऱ्या कमी करून ऑगस्ट अखेर पर्यंत प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून महिन्यातील कोरोना ची स्थिती पाहून दुपारी किंवा सकाळच्या सत्रात बारावीचे वर्ग 15 जून पासून सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. आगामी वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी पूर्ण व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान या विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू करण्याचेही नियोजन आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार