पालघर - पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातून नोकरी कामधंद्यासाठी कामगार मजूर वर्ग पालघर बोईसर डहाणू वसई विरार या भागात आलेला असतो मात्र संचारबंदी च्या काळामध्ये हाताला काम नाही पोटाला भाकरी नाही अर्धी भाकर खाईन पण माझ्या मुलखात जाईन अशी परिस्थिती या मजुरावर आली असताना जे पालघरला चित्र घडलं ते तहसीलदार या नात्याने बरोबर वाटलं नाही परदेशात गेलेल्या लोकांमुळे या देशात कोरोना आला मात्र श्रीमंतांनी आणलेला रोग गरिबांना मात्र सपाटून मार खावा लागला हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही म्हणजे विदेशात गेलेल्या लोकांना तुम्ही विमान पाठवता मात्र गोरगरीब मजूर वर्गाला ट्रेन ने पाठवत असताना त्याला मात्र हातान पायाने तुडवतात मारता हाच का तुमचा कायदा हे तुमचं नियोजन हा तुमचा मानवधर्म हे तुमची माणुसकी वा तहसीलदार साहेब वा आपने अनेक दिवसापासून या सर्व परिस्थितीमध्ये कंटाळलेल्या आहेत आम्हाला तुमच्या भावना कळतात वरिष्ठांचा राग गरिबावर का काढता चुकत असेल तर जरूर मारा
गरिबाला कोणी वाली नाही आणि तुमची आपत्कालीन चे नियोजन चित्र उजेडात आले आहे
अनेक दिवसापासून परेशान झालेला हा मजूर वर्ग मेटाकुटीला आला आहे आणि अशा परिस्थितीत याच्यावरती लाथ मारणे म्हणजे अशोभनीय काम तालुक्यात झाले आहे व तालुक्याची प्रतिमा मलीन करण्याचे काम आपण करत असाल तर ह्या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये अनेक मजुरांचा हातभार आहे त्या हाताना पालघरवाशी कधी विसरणार नाही त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे असे जनतेमधून मागणी होत आहे