नवी दिल्ली, 22 मे : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सामान्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. दास यांनी केलेली महत्त्वाची घोषणा म्हणजे रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्स अर्थात 0.40 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी आरबीआयने कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक सवलती जाहीर केल्या. रिव्हर्स रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली. त्यानंतर रिव्हर्स रेपो दर 4% वरून 3.75% पर्यंत खाली आला. रिव्हर्स रेपो दर कमी झाल्यामुळे बँकांना फायदा होईल. बँकांना कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर रेपो रेट 4.4 टक्क्यांवरून 4 टक्के करण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के असणार आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, कोव्हिड 19 ने अर्थव्यवस्था पांगळी केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती आरबीआय गव्हर्नर देत आहेत. भारतात रोगाचा सामना करण्याचे सामर्थ्य आहे यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे
शक्तिकांत दास म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा देखील महसुलावर परिणाम झाला आहे.