मुंबई : राज्यतील मंदीर आणि रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार असुन येत्या काही दिवसात राज्यातील मंदीर दर्शनासाठी खुले होणार आहे. सरकारने स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाली असुन, पुढील 3 ते 4 दिवसात यासंदर्भात ठोस निर्णयाची येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेली सहा महिन्यापासुन बंद असलेली मंदिरं सुरु करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी सह विविध पक्षांकडून आंदोलनंही करण्यात आली आहेत. त्याचाच विचार करुन राज्यातील मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. राज्यातील मंदिरांसाठी ई-दर्शनाच्या माध्यमातून मर्यादित संख्येने देवदर्शन करता येऊ शकेल, अशी पद्धत अवलंबण्यासंदर्भात या बैठकीतच चर्चा झाली. तसेच मंदिरात जाण्याची वेळ बुक करता येऊ शकेल, अशा पद्धतीबद्दलही टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याची माहित आमच्या खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.