सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कांद्याचे उत्पादन यंदा जास्त असताना राज्यभरातील उपाहारगृहे बंद असल्याने मागणी घटून दर पडलेले आहेत

साठवणूक करून मागणी वाढल्यावर चढय़ा दराने विक्रीचा बेत

Aishwarya Dubey
  • Aug 25 2020 10:21AM

कांद्याचे उत्पादन यंदा जास्त असताना राज्यभरातील उपाहारगृहे बंद असल्याने मागणी घटून दर पडलेले आहेत. अशा वेळी कांद्याचे दर वाढवून आवक वाढेल अशा पद्धतीने कृत्रिम तेजी काही व्यापाऱ्यांनी के ली. यामागे कांद्याची साठवणूक करून पुढे मागणी वाढल्यावर चढय़ा दराने त्याची विक्री करण्याचा हा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे.

यंदा रब्बी व उन्हाळी हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले. त्यात करोनामुळे बाजार समित्याच्या आवारातील लिलाव बंद  होते. तसेच आठवडे बाजार तसेच राज्यातील उपाहारगृहे बंद आहेत. त्यामुळे कांद्याला मागणी नव्हती. निर्यात ठप्प झाली होती. निर्यातीला परवानगी दिली तरी जगभर मागणी कमी होती. दरही कमी होते. बांगलादेश व दुबईला कांदा जात आहे. पण मागील वर्षीच्या तुलनेत निर्यात कमी आहे. पुरवठा जास्त व मागणी कमी यामुळे कांद्याच्या दरात मोठी मंदी आली. मागणी व पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त असल्याने दर कोसळले.

कांदा जानेवारी महिन्यापासून ते जूनपर्यंत भाव आठशे ते रुपयांपर्यंत होते. कांदा काढणीच्या वेळी पाऊस झाला होता. हा कांदा चाळीमध्ये सडू लागला तसेच मेच्या अखेरीला पाऊस सुरू झाला. त्याने कांदा सडू लागला. पाऊस सतत चालू असल्याने कांद्याला मोड फुटू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने कमी दर मिळत असूनही बाजारात कांदा विकावा लागला. मात्र या महिन्यापासून दरात सुधारणा झाली. आता कांद्याचे दर एक हजार ते सोळाशे रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. कांदा दरात फारशी तेजी आलेले नाही. पण कांदा मंदीच्या गर्तेतून बाहेर पडला आहे. अद्याप तेजीकडे वाटचाल झालेली नाही. पण २०१८ साली जशी कृत्रिम तेजी तयार करण्यात आली होती. तसाच प्रयत्न सुरू आहे.

गेल्या आठवडय़ात मनमाड, राहाता, श्रीरामपूर, घोडेगाव, नगर, पुणे आदी बाजार समित्यांच्या आवारात कांद्याला क्विंटलला २२०० ते २६०० रुपये दर देण्यात आला. दहा ते वीस गोण्यांना हा दर दिला गेला. कृत्रिम तेजी ही पाचशे ते सहाशे रुपये वाढीवर जाऊन पोहचली. दक्षिणेकडचा कांदा सडला, मध्य प्रदेशातील चाळीत कांदा राहिला नाही.

आता राज्यात चाळीत असलेला कांदा सडला असल्याने तो विकून टाकला गेला. आता फारच कमी कांदा चाळीत शिल्लक आहे, अशा अफवा मोठय़ा प्रमाणावर पसरविण्यात आल्या. एकूणच दरवाढीचे हे कारण देण्यात आले. कांद्याच्या या तेजीने बाजार समित्यांचे नाव झाले. काही व्यापारी जास्त दर देतात म्हणून त्यांचे नाव समाजमाध्यमातून झळकले. अचानक आलेल्या तेजीने बाजार समित्या, व्यापारी व शेतकरी पुरते गोधळून गेले. त्याचा अर्थ हा प्रत्येकजण स्वत:च्या सोयीने लावू लागला. पण हा फुगा दोनच दिवसांत फुटला आहे. ही कृत्रिम तेजी जाणीवपूर्वक काही लोकांनी निर्माण केली होती.

मागील आठवडय़ात स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, पोळा आदी सुटय़ा होत्या. तसेच राज्यभर सर्वत्र पाऊस कोसळत होता. त्यामुळे कांद्याची बाजार समितीच्या आवारात आवक कमी झाली होती. ही आवक वाढविण्यासाठी काही बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे. तर कांद्याची पळवापळवी हा व्यापाऱ्यातील खेळ नेहमी सुरू असतो. मोठय़ा व्यापाऱ्यांना शह देण्यासाठीदेखील तसेच व्यापारातील असूयेपोटी हा उद्योग काहीजण करतात.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार