सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवरायांच्या रायगडाला वादळ पचवणं काही नवीन नाही – उद्धव ठाकरे

रायगड आणि वादळ यांचं जुनं नातं असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे

Aishwarya Dubey
  • Jun 5 2020 5:12PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी रायगडसाठी १०० कोटींची मदत जाहीर केली असून पंचनामे झाल्यानंतर अंतिम मदत जाहीर करु असं सांगितलं. “इतिहास पाहिला तर अनेक वादळं ज्यांनी पचवली त्या शिवरायांची ही राजधानी आहे. त्यामुळे वादळ पचवणं रायगडाला काही नवीन नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

१०० कोटींची मदत जाहीर –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यासाटी १०० कोटींच्या मदतीची घोषणा केली. वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यांचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करु असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं की, “आपण पॅकेज जाहीर करणार नसून तातडीनं रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारकडून १०० कोटी देत आहोत. एक अंदाज घ्यावा लागेल. उगाच वारेमाप घोषणा करण्यात अर्थ नाही. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानीकडे पाहत असताना पंचनामे कऱण्यास सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर अंतिम मदत जाहीर करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, केंद्राकडे मदत मागण्यासंबंधी विचारलं असता उद्धव ठाकरेंनी नुकसान झाल्यानंतर लगेच मागावं असं होऊ नये. आपण व्यवस्थित आढावा घेऊन मदत मागू असं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचं आश्वासन दिलं असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

“अनेक ठिकाणी पडझड झाली असून स्वच्छता करावी लागेल. जनावर मृत्यूमुखी पडलेलं असेल तर रोगराई होण्याची शक्यता आहे. वीजेचा पुरवठा पूर्ववत झाली पाहिजे. घरं पडली आहेत त्यांची सोय करण्यात येणार आहे. मदतीसाठी बाहेरुन टीम द्याव्या लागतील,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

“आज जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीच रायगडमद्ये यावं लागलं. निसर्गाचं रौद्ररुप आपण पाहिलं पण रायगडने ते अनुभवलं. ती दृष्य अत्यंत भीतीदायक होती. रायगडमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आलो आहे. जीवितहानी होऊ न देणं प्रशासनाचं काम असतं. पण सहा जण मृत्यूमुखी पडले हे दुर्दैव आहे. पैसे देता येतात पण घरातली गेलेली व्यक्ती परत येत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार