सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राणीबागेसंबंधी केलेल्या ‘त्या’ ट्वीटनंतर नितेश राणे शिवसेनेची माफी मागण्यास तयार

नितेश राणेंविरोधात शिवसैनिकांची वरळी पोलीस ठाण्यात तक्रार, मुख्यमंत्र्यांबाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा आरोप

Sudarshan MH
  • Dec 23 2021 1:12PM

भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यानंतर शिवसैनिक आता नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे. नितेश राणे यांच्यासमोर सध्या दोन अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे नितेश राणेंनी राणीबागेसंबंधी केलेल्या ट्वीटनंतर शिवसैनिकांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांबाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा नितेश राणेंवर आरोप आहे. तर दुसरीकडे हत्येचा प्रयत्न झाल्याच्या एका प्रकरणात चौकशी करत असताना आरोपीने नितेश राणे यांचं नाव घेतलं असल्याने कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर नितेश राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

राणीबागेसंबंधी ट्वीट प्रकरणी शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणी कोणाच्या भावना दुखावल्या आहेत याबदद्दल विचार केला पाहिजे. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल शिवसेना कधी माफी मागणार? त्याबद्दल त्यांनी सांगावं. अशी निवेदनं त्यांनी देत राहावं. आम्ही पाहत राहावं असं काही आहे का? समस्त हिंदू धर्माचा सातत्याने अपमान करत असल्याबद्दल आधी माफी मागावी नंतर माझ्याकडून अपेक्षा करावी”

 

 “माझ्या ट्वीटबद्दल शिवसेना रोजच आक्रमक होत असते. रोज सकाळी उठल्यानंतर त्यांना दुसरं काय काम आहे. यापेक्षा एसटी कामगार, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी आक्रमक झाले असते तर महाराष्ट्राचं भलं झालं असतं,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

 “मला जी माहिती मिळाली त्यानुसार मी ट्वीट केलं होतं. त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर आधी त्यांनी हिंदूंची माफी मागावी, मग मी माफी मागण्यास तयार,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

 तमाम हिंदूंच्या माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव बदलणार का? अशी विचारणा नितेश राणे यांनी ट्वीट करत केली होती.

 “कणकवलीबद्दल बोलायचं गेल्यास मी पोलिसांकडे जबाब दिला असून सहकार्य केलं आहे. या केसशी माझा दूरपर्यंत काही संबंध नाही. फक्त शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. एका बाजूला अनिल परब आणि रामदास कदम आणि आमच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत आणि विनायक राऊत यांच्यातील जो संघर्ष आहे त्यातून झालेला हा वाद आहे. यात कोणीतरी हवं आहे म्हणून माझ्यावर टाकलं आहे. पोलिसांनी जी माहिती हवी होती ती मी वकिलामार्फत दिली आहे,” असं नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.

 नितेश राणे यांनी यावेळी सर्व प्रकरणांची अशी चौकशी होणार का विचारणा करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. “दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख झाला होता. मुंबई पोलीस त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत का? कायदा सर्वांसाठी समान असतो,” असं ते म्हणाले.




सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार