महाराष्ट्रात काँग्रेस सरकार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात फोनवर संवाद झाला. यावेळी राहुल गांधी यांनी उध्दव ठाकरे यांना कोरोना संकटात काँगेस महाविकास आघाडीसोबतच आहे असे आश्वासन दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती. त्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली.
दरम्यान, यापूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नाही असे वक्तव्य केले होते. यावरून चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या नंतर उध्दव ठाकरे यांनी थेट राहुल गांधी यांना फोन करून सांगितले की, सरकार मध्ये काँग्रेसचा सन्मान राखला जाईल असे म्हटले आहे. तसेच निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेतला जात असल्याची भूमिकाही सांगितली.