वाढीव वीज बिल सुधारीत करून देत नाही. तोपर्यंत भाजपा असंच आंदोलन करत राहणार.
राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे.तर, ”ये तो बस झांकी है, आगे और लढाई बाकी है!..जो पर्यंत सरकार वाढीव वीज बिल सुधारीत करून देत नाही. तोपर्यंत भाजपा असंच आंदोलन करत राहणार.” असा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला.