सुखी, संपन्न, शक्तिशाली समाज निर्मिती म्हणजेच आत्मनिर्भर भारत : ना. गडकरी
सहा महिन्यात मनपाची सर्व
वाहने सीएनजीवर आणा
जैविक इंधनाचा वापर करणे व इंधनात स्वयंपूर्ण होणे हाही आत्मनिर्भरतेचा एक मार्ग असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- येत्या 6 महिन्यात महापौरांच्या वाहनांपासून कचरा गाड्यांपर्यंत सर्व वाहने सीएनजी इंधनात रुपांतर करण्याचा प्रयत्न करा. सीएनजीसाठी लागणारे सीएनजी फिलींग सेंटरही उभे करा. एवढेच काय, शहरातील ऑटोही सीएनजीवर चालले तर एका ऑटोचालकाला आजच्या तुलनेत 500 रुपये अधिक मिळतील. तसेच सेंद्रीय खत निर्मिती घरच्या घरी करता येईल. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवून शहरात प्रायोगिक तत्त्वावर 25 हजार घरांपर्यंत घरगुती कचर्यातून सेंद्रीय खत निर्माण होईल, असा प्रयत्नही केला जावा. अशा लहान लहान उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल व तरुण स्वावलंबी होतील. हीच आत्मनिर्भर भारताची संकल्पना असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.