राज्यात कोरोनाची समस्या भीषण होत आहे, सर्वजण एकत्रितपणे सामना करू भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेली कोरोना महामारीची समस्या कमी होताना दिसत नाही उलट परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करू या, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केले.