पूरग्रस्तांच्या घरांचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्या बावनकुळे यांची शासनाकडे मागणी
नागपूर जिल्ह्यातील धरणे भरून ओव्हरफ्लो सुरु झाले आहे आणि जिल्ह्यातील पारशिवनी, सावनेर, रामटेक, कामठी मौदा या तालुक्यांमधील काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो लोकांची घरे पाण्यात असून हजारो हेक्टरवरील शेतकर्याची पिकेही पाण्याखाली गेली आहेत. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त घरांचे सर्वेक्षण करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश महासचिव व चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.