“ते” गावगुंड तर “हे” गाढव! भाजयुमोचा पलटवार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचे काम हे लोक करत असतात. ज्यांच्याकडे बोलण्याकरिता काहीही नाही, वैचारिक क्षमता नाही व ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही असे लोकं अश्या प्रकारचे बेताल वक्तव्य करत असतात. जर नाना पाटोलेंनी चुकीच्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली नाही तर भविष्यात हे आंदोलन अधिक चिघळेल व त्याकरीता युवा मोर्चा जबाबदार राहणार नाही.