अवकाळी पावसाने शेतीला झोडपले,विदर्भाचा शेतकरी पुन्हा हवालदिल...
विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या 4 जानेवारीपासून आस्मानी संकटांचा सामना करावा लागतो आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूरसह इतरही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे.