शिष्यवृत्ती कारणाखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द होणार नाही....मंत्री वडेट्टीवार*
०१९-२० या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना द्येय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे विद्यार्थ्याना आवश्यक असलेले सर्व दाखले, प्रमाणपत्र, व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे असे आदेश मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून म्याट्रीकोत्तर शिक्षण देणार्या सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आले आहे.