रोजगार निर्मितीशिवाय गरिबी-भूकमरीसंपणार नाही : नितीन गडकरी
जोपर्यंत लोकांना रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत गरिबी आणि भूकमरी संपणार नाही व स्वाभिमानाने जगता येणार नाही. अनेक योजना आणून रोजगार निर्माण कसा करता येईल यासाठी भंडारा-गोंदियातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.