महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामपंचायतीमार्फत अधिकाधिक कामे सुरू करा-मनीषा खत्री
नंदुरबार दि.27:जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक कामे सुरू करा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.