21 टीएमसी पाणी लातूरला देण्याचे वचन मंत्रीमहोदयांनी पाळावे - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून प्रसिध्द आहे. हे संकट कायमचे घालण्यासाठी मागील काळात उजणी धरणाचे पाणी कृष्णा व गोदावरी खोर्यातून लातूरसहीत मराठवाड्याला आणण्यासाठी कै.विलासरावजी देशमुख यांनी भूमिपुजन केले होते. तेच उजणी धरणातील पाणी लातूरला निवडूण आल्यांनतर एक महिण्यात आणू नसता राजीनामा देवू असे जाहीर वचन ना.अमित भैय्या देशमुख यांनी दिले होते. आज ते राज्यात कॅबीनेट मंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारला येवून पावनेदोन वर्ष होत आहे. तरीही उजणीच्या पाण्यासंदर्भात कसलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जनतेला दिलेले वचन पाळावे, असे आव्हान माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.