शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे ऊसाला भाव मिळणार राजकीय उद्देश ठेऊन केल्या जाणाऱ्या आंदोलनाकडे शेतकरी सभासदांनी दुर्लक्ष करावे-श्रीशैल्य उटगे,
दुष्काळी परिस्थितीमुळे मागच्या वर्षी साखर कारखाने बंद होते परिणामी एफ.आर.पी. अद्याप निश्चित झालेली नाही त्यासाठी साखर आयुक्तांकडे पाठपुरावा सुरु आहे. सदरील तांत्रिक अडचण दुर होताच मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांकडून शेतकरी सभासदांना त्यांच्या अपेक्षेनुसार ऊसाचा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे विरोधी मंडळीकडून राजकीय हेतू समोर ठेऊन केल्या जाणाऱ्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष करावे, असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन रविंद्र काळे यांनी केले आहे.