राज्यव्यापी आराधी-गोंधळी-वाघ्या-शाहिर-भजनी परिषदेची वतीने श्री क्षेत्र तुळजापूर पर्यंत दंडवत यात्रा
पुन्हा एकदा लोककलावंतांच्या न्याय मागण्यासाठी जागरआराधी-गोंधळी- वाघे-शाहिर भजनी परिषदेच्या वतीने पुन्हा एखदा २५ वर्षानंतर महाराष्ट्रात पारंपारीक लोककलावंतांच्या न्याय मागण्यांसाठी दंडवत यात्रा काढून जनजागरणास प्रारंभ केला आहे, असे प्रतिपादन परिषदेचे प्रांताध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी नणंद येथे दंडवत यात्रेत सहभागी असणाऱ्या सर्वांचा सहृदय सत्कार भवानी माता मंदीरात आयोजित ऋणनिर्देश सत्कार समारंभात केले.यावेळी भाजपा जेष्ठ नेते व्यंकटराव पनाळे, राजेंद्र वनारसे, ह.भ.प. भास्कर महाराज रामेश्वरकर यांच्या हस्ते पुष्पाताई म्हेत्रे, तात्यासाहेब देशमुख, सुभाषराव जाधव आणि दंडवत यात्रेत सहभागी असणाऱ्या सर्वांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नणंदचे माजी सरपंच माधवराव पाटील, माजी सरपंच शशिकलाबाई विरगावे, माजी चेअरमन नामदेव मारूती म्हेत्रे, बळीराम तोपन्ना, विक्रम श्रीमंत पाटील, सरपंच हरिदास बोळे, ग्रामसेवक धनंजय कोसले, रूक्मीणबाई अराधीन, राजाराम कुंभार, लक्ष्मण कांबळे, तात्यासाहेब तेलंग, सनिताताई माळी, केसरबाई माळी, परशुराम जाधव, दत्ता मिरगळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन पाणी फाऊंडेशनचे अमित तानाजी पाटील यांनी केले.