दिव्यांगांच्या कल्याणासाठी राज्याची नोडल एजन्सी म्हणून लातुरच्या 'संवेदना'ची निवड
देशातील बौद्धिकदृष्ट्या दिव्यांगांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने न्यासचे काम चालते. या न्यासकडून प्रत्येक राज्यामध्ये स्टेट नोडल एजन्सी म्हणून एका संस्थेची नियुक्ती करणे आवश्यक असते. रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या संवेदना प्रकल्पाचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य समन्वय समितीच्या सदस्य सचिवपदी संस्थेची निवड झाली असून हा लातुरकरांचा बहुमान आहे.