राज्यातील आघाडी सरकार शेतकरी हितविरोधी प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे
शेतकर्यांना केंद्र बिंदू मानून केंद्रातील नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकरी सन्मान योजनेसह शेतकर्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून दिलासा देण्याचे आणि आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र राज्यातील आघाडी सरकारने शेतकर्यांना कसलीच मदत केली नाही उलट पीक विम्याचे निकष बदलून विमा कंपन्यांना मालामाल केले. खर्या अर्थाने राज्यातील ठाकरे सरकार शेतकरी हिताविरोधी आहे असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी लातूर येथे बोलताना केले