*वीज बिलासंदर्भात दिलासा देण्याचा हाय कोर्टाचा नकार, राज्य वीज नियामक मंडळाकडे दाद मागावी.*
लॉकडाऊन दरम्यान आलेल्या भरमसाट बिलांबाबत दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी नकार दिला आहे. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य विज नियामक मंडळाकडेच दाद मागावी असं स्पष्ट करत, वाढीव वीज बिलांबाबत आलेल्या तक्रारींवर ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश हायकोर्टानं महामंडळाला दिले आहेत.