तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? जनतेचा आणि लोकशाहीचा बळी देणे दुर्दैवी: देवेंद्र फडणवीस
मुंबई, 22 जून शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध समाजबांधव यांचे अनेक प्रश्न आज ऐरणीवर असताना, मराठा तसेच ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.