राजकीय स्वातंत्र्य की सांस्कृतिक पारतंत्र्य !
भारतातील कच्चामाल इंग्लंडला पाठवून भारतात पक्क्या मालाची बाजारपेठ निर्माण केली आणि त्यांना अनेक सवलती दिल्या परंतु येथील स्थानिक व्यवसायाला बंद पाडण्याकरिता त्यांच्यावर अनेक कर लादून येथील व्यवसाय डबघाईस आणले.सोबतच स्थानिकांना परावलंबी बनविले. भारतीय समाज हा जगातील अत्यंत परिवर्तनशील समाज समजल्या जातो परकीय लोकांचे आचार-विचार, खानपान,वेशभूषा यांचा भारतीय समाजाने स्वीकार केला. परंतु कालांतराने यामुळे समाजाची आपल्या धर्म व संस्कृती वरील निष्ठा ही कमी होत गेली.