ओबीसीचे आरक्षण परत द्या अन्यथा सत्तेवरुन चालते व्हा
महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे ओबीसी समाजाच्या हक्काचे राजकीय आरक्षण संपूष्टात आले तर मराठा समाजाचे आरक्षण टिकवता आले नाही. सर्व समाज घटकावर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारवर कोणीही समाधानी नाही, कोणीच सुरक्षित नाही. रोज नवीन घोटाळे समोर येत आहेत. या शासनकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत नाही दिले तर येत्या काळात रस्त्यावर उतरून तिव्र संघर्ष करू असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड यांनी दिला