15/5/2020
नागपूर --- शहरातील सुप्रसिद्ध खानावळीत जेवण मिळण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली.. की एक थाळी वर दोन थाळी फ्री आणि ती ही घरपोच... ग्राहकांचे16हजार आणि अनुक्रमे चार हजार रुपये झाले अज्ञात बँक खात्यात वळते...
लॉक डाऊनचा पार्श्वभूमीवर सगळ्यांचे जीवन थांबले आहे. मात्र भारत सरकारने जीवनावश्यक वस्तू आणि ऑनलाईन व्यवहार सुरू ठेवायला परवानगी दिल्याने याच संधीचा फायदा सायबर संधी साधून घेतला आहे.
नागपूर शहरातील सुप्रसिद्ध भोजनालय म्हणजेच गायत्री भोजनाल या धरमपेठ, धंतोली, प्रताप नगर अशा वेगवेगळ्या स्थानांवर गायत्री भोजनालय शहरात आहे. याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी धरमपेठ गायत्री भोजनाल नावे फेसबुक पेज वर जाहिरात दिली. की एका थाळी वर दोन. थाळी फ्री आणि तीही दहा रुपये नाममात्र बुकिंग अमाउंट वर घरपोच...
या जाहिरातीला फसलेले श्री अलट थाळी बुक केली तर त्यांना एक लिंक पाठवण्यात आली.. या लिंक वर क्लिक केल्यावर त्यांच्या अकाउंट मधले 50हजार व 16 हजार असे पैसे ट्रान्सफर करण्यात आले त्यांनी सायबर क्राइमला सूचना दिली तर त्यांच्या अकाउंट मध्ये 16 हजार परत आले. मात्र 50 हजारांचा व्यवहारात कार्डमुळे फसला असल्याने. 50हजार यांचे वाचले तर एका पीडित मुलीची आई हॉस्पिटलमध्ये असल्याने जेवणाची सोय झाली म्हणून गायत्री भोजनालयाची ही फेसबुक वरील जाहिरातपाहून एक थाळी तिने बुक केली. तर तिच्या खात्यातील चार हजार रुपये वळते झाले...
या सगळ्या प्रकरणात गायत्री भोजनालया चे मालक अजय व विजय जोशी यांचा काहीही संबंध नाही. कारण पोलीस चौकशीत हा नंबर किंवा सायबर चोरांची टोळी पश्चिम बंगालची असल्याचे समजले.. तेव्हा सावध व्हा,घरी रहा सुरक्षित रहा. आपले बँक डिटेल्स तसेच ओटीपी कोणालाही देऊ नका...