सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार - ,महावितरण कंपनीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रियेत SEBC प्रवर्गातील उमेदवारांना वगळण्यात आले आहे. यामुळे आमच्या मराठा समाजातील युवकांवर एकप्रकारे अन्याय होत आहे. अशी मराठा समाजात संतप्त भावना आहेत. याच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटत आहेत. तरी मार्था समाजातील होणारा हा अन्याय आपण दूर करून SEBC प्रवर्गातील उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामावून घ्यावे अन्यथा भरती प्रक्रिया पूर्णपणे स्थगित करून पुढील निर्णयात SEBC प्रवर्गातील उमेदवारांना सामावून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. अन्यथा मराठा क्रांती मोर्चातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे.