नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
झाडं तोडल्याप्रकरणी तीन भावांना नवापूर कोर्टाने तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 60 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नवापूर कोर्टाने हा दणका दिला आहे
झाडं तोडल्याप्रकरणी तीन भावांना तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 60 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नवापूर कोर्टाने हा दणका दिला आहे. आरोपी तीन भावांनी नवापूर तालुक्यातील प्रतापपूर जंगलात सागवान आणि कुडी जातीची 60 झाडं तोडली होती. याप्रकरणी नवापूर वन विभागाने गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने तिघांना 14 दिवसांची कोठडी सुनावली.
जंगलातील सागवान आणि कुडी जातीचे अवैधरित्या वृक्ष कत्तल केल्याने 17 हजारांचे नुकसान झाले आहे. संशयित आरोपी विलास गावीत, प्रवीण गावीत,अरविंद गावीत रा.बोरझर यांना त्यांचा राहत्या घराजवळून अटक करण्यात आली. त्यांचाविरोधात वन कायदेअंतर्गत गुन्हा नोंद केला. वनपाल बोरझर यांनी तिन्ही आरोपींना नवापूर न्यायालय येथे हजर केले.
काय आहे नेमकं प्रकरण?
आरोपी तीन भाऊ विलास, प्रवीण आणि अरविंद गावीत हे तीन भाऊ हे नवापूर तालुक्यातील बोरझर गावात राहतात. मात्र या भावांनी जवळच्या जंगलात मोठी वृक्षतोड केली. या तिघांनी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 60 झाडं तोडली. सागवान आणि कुडी या जातीची ही झाडं होती. सागवानाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या झाडांची कत्तल या तिघा भावांनी केली.
याबाबतची कुणकुण वन विभागाला लागली. वन विभागाने धडक कारवाई करुन तिघा भावांवर गुन्हा दाखल केला. पुढे त्यांना कोर्टात दाखल केल्यानंतर, कोर्टाने तिन्ही भावांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवलं
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333