नांदेड दि.31(अरविंद जाधव) सबंध महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल आले पण नांदेड जिल्ह्यातील आदर्श गांव म्हणून महाराष्ट्रात नवाजलेले आनेक पारितोषिक पटकावलेले शेळगांव गौरी ता,नायगांव येथील ग्रामपंचायत निवडणूकीत सत्ताधार्याना धक्का देऊन परिवर्तन विकास पँनल ने आश्चर्य करणारे निकाल देणारे खरे गावातील जागरुक नागरिक व तरुण आसल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हाचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी व्यक्त केले.
नांदेड येथील खासदार चिखलीकर याच्या "साईसुभाष" येथील मुख्य कार्यालयात निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार आयोजित केला होता.यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी माजी आमदार अविनाश घाटे साहेबांचे विशेष कौतुक केले व मा.आ.घाटे साहेबाचे आभारही मानले .खा.चिखलीकर साहेब म्हणाले की मा.आ.घाटे साहेब यानी एक सयंमी व कुशल युवा नेतृत्व म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर याना परवानगी देऊन त्याना या निवडणूकीत उभे राहु दिले,ग्रामीण भागातील आनेक समस्यांचा आभ्यास आसणारेच आश्या परिस्थितीशी सामना करत आसतात.खा.चिखलीकर साहेब यानी सर्वसामान्याच्या सोबत मि नेहमीच आहे व शेळगांव गौरी ता.नायगांव येथे आपण सागाल त्या कामासाठी मि तयार आसल्याचा शब्द दिला व सर्व नवनिवाचित ग्रामपंचायत सदस्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी शेळगांव गौरी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन व पत्रकार सुनिल रामदासी यानी प्रास्तविक केले.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार अविनाश घाटे.जि.प,सदस्य प्रविण पा.चिखलीकर.प्रा,सदिंप वाघ सर.व शेळगांव गौरी येथील परिवर्तन विकास पँनल प्रमुख प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर, मा,उपसरंपच हाणमंतराव वाघमारे.राजेन्द्र पाटील,अविनाश पाटील, माजी सैनिक तथा ग्रा.सदस्य मोहण मेडाबलमेवार.प्रा.समदानी सय्यद.लक्ष्मण कांबळे.श्रीराम वाघमारे.शिवाजी वाघमारे.आदि उपस्थित होते