सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत चुकीची माहिती दाखवून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी निर्मात्यांवर कारवाई करा ! - भाविक व हिंदू संघटनांची मागणी !

भाविक व हिंदू संघटनांची मागणी !

Sudarshan MH
  • Nov 12 2020 4:03PM
श्री जोतिबा देवस्थान हे कोट्यवधी हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री जोतिबा देवतेवर आधारित ‘दख्खनचा राजा जोतिबा’ नावाने एक मालिका नुकतीच आरंभ झाली आहे. या मालिकेच्या प्रक्षेपणापूर्वी ‘पुजार्‍यांकडून योग्य माहिती घेतली जाईल, चुकीची माहिती दिली जाणार नाही’, असा शब्द निर्माते महेश कोठारे यांनी दिला होता. प्रत्यक्षात 23 ऑक्टोबरपासून ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवर चालू झालेल्या या मालिकेत अनेक विपर्यास करणारे प्रसंग दाखवून अत्यंत खोटी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. या मालिकेमुळे अनेक भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि भक्तांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत चुकीची माहिती दाखवून भक्तांच्या भावना दुखावल्याविषयी ‘कोठारे व्हिजन प्रा. लि.’ वर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या वतीने 12 नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

     या मालिकेतील पुढील प्रत्येक भाग हे धार्मिक, ऐतिहासिक दस्तएैवज यांचा अभ्यास करूनच दाखवण्यात येतील, अशी श्री. महेश कोठारे यांनी लेखी हमी दिल्यावरच पुढील भागांचे प्रक्षेपण करण्यास अनुमती देण्यात यावी, तोपर्यंत मालिकेवर बंदी आणावी, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली.

      ही मालिका ‘केदार विजय’ या ग्रंथावर आधारित असेल, असे सांगण्यात आले होते; प्रत्यक्षात पहिल्या भागापासून तसे दिसून येत नाही. कथेचा पूर्णपणे गोंधळ उडालेला असून ‘यमाई’, ‘अंबाबाई’, ‘चोपडाई’ यांच्या व्यक्तीरेखा लेखकाला समजल्या आहेत का ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. रत्नासुराला अंबाबाईने कधी वरदान दिले ? ‘वाडी रत्नागिरी’ या डोंगराचे प्राचीन नाव ‘मैनाकगिरी’ होते, याचा विसर लेखकाला पडलेला आहे. या मालिकेत श्री जोतिबा देवाची भाषा ग्रामीण पद्धतीची दाखवली आहे आणि राक्षसांची भाषा शुद्ध दाखवली आहे. प्रत्यक्षात जोतिबा देवाने विद्याभ्यास केला होता. त्यामुळे देवाची भाषा शुद्ध हवी होती. देवाधिदेव दख्खनचा राजा अशी ज्यांची महती आहे, त्यांच्यासाठी मालिकेत वापरली जाणारी भाषा योग्य नसून ती देवांचा अपमान करणारी आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या चुकीच्या गोष्टी मालिकेत दाखवण्यात आल्या आहेत, त्याविषयी महेश कोठारे आणि ‘स्टार प्रवाह’ वाहिनी यांनी भाविकांची जाहीर क्षमा मागावी. यापुढे कोणत्याही देवता किंवा ऐतिहासिक विषयांवर मालिका बनवतांना त्यांतील संदर्भ अन् इतिहास हा योग्य आहे ना, याची पडताळणी केल्याशिवाय अशा मालिकांना मान्यता मिळू नये, यासाठी यंत्रणा उभारावी, अशीही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार