आठ दिवसाचा टाईम बाँन्ड,अन्यथा परिणाम भोगावे लागणार
-सकल मराठा समाजाचा ईशारा.
नांदेड दि.13 (अरविंद जाधव) आज रोजी सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय चिंतन बैठक श्री हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजय नगर येथे पार पडली. बैठकीच्या सुरूवातिला मराठा भगिणीच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुण जिजाऊ वंदन म्हणण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या शिक्षण व नोकर भरतीवरील स्थगिती उठवण्या बाबत समाजात खदखद दिसत आहे.मराठा आरक्षण स्थगिती नंतर आता पुढे काय ?
हा प्रश्न नक्किच उभा राहतो. यावर पुढील दिशा ठरवण्यासाठी काही महत्वपूर्ण ठराव मांडण्यात आले.
◆आठ दिवसाचा टाईम बाँन्ड देत मराठा समाजाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहावे असा गर्भित ईशारा आज सकल मराठा समाजाने दिला.
◆राज्य सरकारने तात्काळ चीफ जस्टीस आँफ इंडिया यांच्याकडे आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी मागणी करावी.
◆ज्या ज्या विद्यार्थ्यानी परिक्षेचे फाँर्म भरले आहेत अशा विद्यार्थ्याना ई.डब्लू.एस ओपन करावे व त्यांना वर्ग,श्रेणी बदलण्याचा अधिकार द्यावा.
◆ज्या ज्या विद्यार्थ्याना आरक्षणाच्या भरवश्यावर प्रवेश मिळालेला आहे.अशा विद्यार्थ्याना राज्य सरकारने फी मध्ये सवलत द्यावी इतर आरक्षणाप्रमाणे 50% फी राज्य सरकारने भरावी.
◆वीस हजार पोलिसभरती रद्द करावी.
◆आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळातील जाचक अटी कमी कराव्यात.
◆जिल्हयातील शासकीय भूखंडावर मराठा मुला,मुलींसाठी वसतिगृह चालु करावे.
◆बार्टीच्या धरतीवर सारथी मराठा समाजासाठी कार्यान्वित करावी.
◆मराठा आरक्षणातील हुतात्मांच्या कुटूंबियांना 10 लाख मदत करावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत रूजू करून घ्यावे.
राज्य सरकारमधील मंञी वर्षा गायकवाड यांनी कोर्टाची आँर्डर येण्याआधिच आरक्षण विरोधी निर्णय घेतल्याने अशा मराठा विरोधी मंञ्याचा निषेध सर्वानुमते करण्यात आला.
सामाजिक,राजकीय, शैक्षणिक,वैद्यकीय, शेतकरी, शेतमजूर या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे समाज बांधव/भगिनीनी मोठ्या प्रमाणात बैठकीस हजेरी लावली होती.गावगाड्यातून तालुक्यातुन अनेक समाज बांधव सुद्धा बैठकीस उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा बैठकीला एक मराठा समाज बांधव म्हणुन उपस्थित होते,परंतु सकल मराठा समाज बांधवानी बैठकीच्या सुरुवातीलाच सर्व राजकीय पक्षांवर व त्यांच्या प्रतिनिधी वर बहिष्कार टाकत पहिले राज्याच्या सर्वोच्च सभागृहात समाजाची बाजु मांडा आणि मगच समाजाच्या व्यासपीठावर आपलं मत व्यक्त करा असा गर्भित इशारा देण्यात आला.
सामाजिक चळवळीतील पदाधिकारी,तरूण,तरूणी यांनी राज्य व केंद्र या दोन्ही सरकारवर टिका करत अतिशय प्रखर शब्दात आपली मते मांडली.
विशेष बाब म्हणजे आजची बैठक ही शासनाच्या नियमाचे पालन करत सुरुवातीला सभागृहात येतानाच प्रत्येकाच्या शरीराचं तापमान तपासुन आत सोडण्यात आले, चेहऱ्यावर मास्क,व हँड सँनिटायझरची फवारणी करत सामाजिक अंतराने अतिशय शिस्तबध्द पध्दतीत मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देत राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप करण्यात आला.
जिल्ह्यातील अनेक समाज बांधवानी या बैठकीस हजेरी लावली.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प