केंद्र सरकारकडून १५ वा वित्त आयोगाचा ८६४ कोटी रुपये निधी मंजूर -
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मागणीला यश
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मागणीला यश
केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने देखील कोरोना काळातील कामासाठी ग्रामपंचायतींना ५०० कोटींचा निधी द्यावा - लोणीकर यांची मागणी
कोरोना महामारी च्या संकटात वेगवेगळ्या कोरोना योद्ध्यांनी काम केलं असून त्यातील महत्त्वपूर्ण घटक म्हणून प्रत्येक गावागावातील ग्रामपंचायतीची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलिस पाटील यांच्यासह अनेकांनी अत्यंत धैर्याने व नियोजनबद्ध असे काम करून कोरोना संकटा चा मुकाबला केला आहे. गावागावात अनेक लोकप्रतिनिधींनी गावात कोरोना चा प्रसार होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते त्यासाठी ग्रामपंचायतींना निधीची नितांत गरज होती अशा गरजेच्या वेळी खरे तर राज्य सरकारने मदत करणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मात्र ८६४ कोटी रुपयांचा १५ वित्त आयोगाचा निधी वर्ग केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनादेखील या १५ वा वित्त आयोगाचा निधी काही प्रमाणात वर्ग केला जातो. त्यांनीदेखील कोरोना काळात चांगले काम केले असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता
केंद्र सरकारने १५ वित्त आयोगाचा निधी वर्ग केल्यानंतर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय ग्रामविकास मंत्री व केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. प्रत्येक गावाला गावगाडा चालविणे कठीण झाले होते अशा परिस्थितीत केंद्र सरकारने १५ वा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध करून दिलासा दिला आहे. कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, गावांमधील फवारणी इत्यादी कामांसाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे खर्या अर्थाने ज्या वेळेला ग्रामपंचायतीला निधी ची आवश्यकता होती अशा निकडीच्या वेळी केंद्र सरकार धावून आले व केंद्रातील मोदी सरकारने १५ वा वित्त आयोगाचा निधी वर्ग केला त्याबद्दल माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी आभार मानले आहेत
प्रत्येक गावाने अँटीजन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट गावातील कोरोना रुग्णांचे विलगीकरण त्यांची व्यवस्था गावात कोरोना पसरू नये यासाठी घेतलेली काळजी, फवारणी यासारखी विविध कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते परंतु केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणार्या १५ वित्त आयोगाच्या निधी व्यतिरिक्त कोणताही निधी ग्रामपंचायतींना देण्यात आलेला नाही. किमान आतातरी केंद्र सरकारच्या निधीप्रमाणे ५०० कोटी रुपयांचा निधी खासबाब म्हणून कोरोना काळातील कामांसाठी ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प