सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना संभाजीनगर संदर्भात स्पष्ट भूमिका कधी आणि केव्हा घेणार.. प्रवीण दरेकर

संभाजीनगरच्या नामांतराला शिवसेना कोणतीही ठाम भूमिका घेत नसून त्यांची भूमिका सध्या दुटप्पी व धरसोड स्वरुपाची आहे, त्यामुळे संभाजीनगरच्या नामकरणासंदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. ती कधी आणि केव्हा करणार अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली आहे.

Snehal Joshi .
  • Jan 3 2021 8:25PM
संभाजीनगरच्या नामांतराला कॉग्रेसचा ठाम विरोध आहे. तर शिवसेना या विषयावरुन कोणतीही ठाम भूमिका घेत नसून त्यांची भूमिका सध्या दुटप्पी व धरसोड स्वरुपाची आहे, त्यामुळे संभाजीनगरच्या नामकरणासंदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. ती कधी आणि केव्हा करणार अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली आहे.   पुणे येथे दौ-यावर असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, महाविकास आघाडी मधील कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध केला आहे, तर कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही इशारा दिला आहे की, सरकार आमच्यामुळेच आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार हा विषय आमच्या अजेंडावर कधीच नव्हता. त्यामुळे शिवसेनेला सत्तेची लाचारी हवी की, अस्मिता हवी हे शिवसेनेने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.  शिवसेना नेते संजय राऊत सांगत आहेत की हा विषय आम्ही मिटवू तर त्याचवेळी शिवसनेचे चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरच्या नामांतराला कोणी विरोध केल्यास जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका घेत आहेत, पण ती कितपत खरी आहे, शिवसेनेचे आमदार आंबदास दानवे यांनीही या विषयावर नरो व कुंज रोवाची भूमिका घेत आहेत. असे सांगतानाच दरेकर म्हणाले की,  या सर्व विषयाबाबतीत पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि  राज्य सरकारचे प्रमुख म्हणून आपली काय भूमिका आहे हे राज्यातील जनतेला स्पष्ट करावी. संजय राऊत यांनी ट्विट केले होते की, देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरचे नामांतर करावे, पण कदाचित राऊत यांना ही प्रक्रिया माहित नसावी किंवा जाणूनबुजून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगताना दरेकर म्हणाले की, देवेंद्रजींच्या पाच वर्षाच्या काळात कुठल्याही महानगरपालिने तसा ठराव केला नव्हता. पण जर राज्य सरकारची इच्छा असेल व तर कॅबीनेटने तसा निर्णय घ्यायला हवा.  परंतु त्यापेक्षा शिवसेनेला आज सत्ता महत्वाची आहे, की  संभाजीनगरच्या बाबतीत आपली भूमिका अश्या गोंधळलेल्या अवस्थेत शिवसेना आज आहे म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  इडीच्या संदर्भात केवळ भूलथापा इडी ही स्वायत्त संस्था आहे. संविधानाने या लोकशाहीमध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रकार  दुर्दैवाने गेल्या काही महिन्यात राज्यात सुरु आहे. केंद्र सरकारला मानत नाही, सुप्रीम कोर्टाला मानत नाही आणि इडी कारवाईच्या विरोधात रस्त्यावर उतरू अश्या प्रकारचे अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचं प्रयत्न चालू आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे. एकनाथ खडसे यांनी सांगितले होते माझी इडीची चौकशी झाल्यास मी सीडी काढतो. पण मला वाटते की फक्त धमक्या, भूलथापा देण्याचं काम सुरु आहे. कवेळ लोकांना आपले मूलभूत प्रश्न व विकास कामांकडून  दूर नेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा दिसत आहे. असे सांगताना दरेकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय अजून ऐरणीवर आहे,त्या संदर्भात कोणी रस्त्यावर उतरत नाही. अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त आहे, कोकणात निसर्ग वादळ झालं, कायदा सुव्यवस्थेचा महाराष्ट्रात बोजवारा उडाला आहे. पुण्यात परवा अनिल देशमुख येऊन गेले, कॉल सेंटरचे उदघाटन करुन गेले, पण त्यानंतर गुन्हेगारी घटना घडली, याचाच अर्थ गृहमंत्री स्वत: पुण्यात येऊनही जर त्यांचा धाक, दरारा व पोलिसांचा अंकुश नसेल तर सुरक्षेच्यादृष्टीने राज्य खास करून पुणे सुरक्षित आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुण्याच्या विकास कामांना खीळ पुण्याच्या विविध विकास कामांना गेल्या वर्षभऱात आवश्यक निधी मिळत नाही. मेट्रो असेल पीएमआरडीचे प्रकल्प असतील त्यांना निधी नाही. जे  प्रकल्प देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात गतीने चालले होते ते आज ठप्प आहेत. पुणे इंडस्ट्रीचे शहर आहे,पण या ठिकाणी स्थलांतरित लोक बाहेर गेलेली आहेत. येथील उद्योगधंदे आज अस्थिर झाले आहेत. केंद्राने पॅकेज दिली परंतु राज्याने स्वतंत्र उभारणी पॅकेज देण्याची गरज होती, ते दिले नाही. त्यामुळे येथे  आज बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. येथील सर्वच विकास कामे ठप्प झाली आहेत. पण या सरकारला जनतेच्या प्रश्नावर लक्ष द्यायला व त्यांच्या विकासाकडे लक्ष देण्य़ासाठी वेळ नाही. सध्या फक्त सत्ता टिकवण्याची कसरत चालू आहे अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार