नाशिक: राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असतांना अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचा हस्त बहर धरला होता. त्यानुसार मालाची काढणी सुरू झाल्यानंतर दरात सुधारणा दिसून आली होती. मात्र मार्चमध्ये दरात गेल्या पंधरवाड्यात घसरण झाली आहे. गुजरात व राजस्थान डाळिंब उत्पादक पट्ट्यात वाढलेली आवक व तुलनेत कमी दरात डाळिंबाची उपलब्धता यामुळे राज्यातील दर दबावात आहेत. चालू महिन्यापेक्षा किलोमागे २५ ते ३० रुपयांनी दर कमी झाला आहे.
गेल्या पंधरवड्यात डाळिंब दरात घट झाल्याने आर्थिक फटका बसत आहे. हंगाम पुढे एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहील, असे चित्र आहे. दक्षिण महाराष्ट्रातील माल दक्षिण भारतातील मुख्य बाजारपेठेत जात असतो. मात्र सध्या गुजरात आणि राजस्थान राज्यांतील डाळिंबाची बाजारपेठेत आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे.